ज्ञान प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा

१. व्रत म्हणजे काय?

आपले खाणे-पिणे, हिंडणे-फिरणे, व्यायाम, अभ्यास, दिनक्रम म्हणजेच आपले दिवसभराचे वेळापत्रक. त्यात कोणती कामे करावीत आणि कोणती कामे करू नयेत या संबंधी आपणच काही नियम केले, ते नियम आग्रहाने पाळले म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वात पाहिजे तसा चांगला बदल होतो. असा फार पूर्वीपासून…

पूर्ण लेख

२. इतरांचा विचार आणि रोजची उपासना

ज्येष्ठ महिन्याच्या चिंतनात विद्यार्थि-दशा संपल्यानंतर प्रौढ सदस्यांच्या व्यावहारिक आयुष्यात आठ व्रते घेण्यासारखी आहेत असे म्हटले होते. त्यापैकी पहिल्या सहा व्रतांमुळे आत्मसन्मान, स्वावलंबन, तत्परता, गुणवत्ता, सततची प्रगती व प्रतिभा हे गुण वाढू शकतील असे ही म्हटले होते. सातवे व्रत – ‘प्रत्येक…

पूर्ण लेख

३. देशसेवेची सोपी रूपे

प्रथम प्रतिज्ञेप्रमाणे देशसेवा करायची तर त्याचे चार भाग आहेत. पहिला भाग आहे समाजाला अनुकूल बनण्याचा, दुसरा भाग आहे समाजाला अनुकूल बनविण्याचा, तिसरा भाग आहे संघटित होण्याचा व संघटित करण्याचा आणि चौथा भाग आहे समाजात स्वतःला विरघळवून टाकण्याचा. समाजात राहत असताना…

पूर्ण लेख

४. मी करेन.. इतरांनाही सांगेन..

Hints on Nattional Education मध्ये निवेदितांनी civic sense, public spirit, organised unselfishness आणि identification with the Nation हे राष्ट्रीय शिक्षणाचे जे चार पैलू मांडले आहेत, त्याचा संदर्भ मागच्या पत्रामध्ये होता. मागच्या पत्रात ‘समाजाला अनुकूल बनण्याचा’ जो उल्लेख होता तो civic…

पूर्ण लेख

५. संघटना करणे महत्त्वाचे..

प्रथम प्रतिज्ञितांचे तिसरे काम आहे आपण संघटित होणे आणि इतरांना संघटित करणे. आपण चांगलं म्हणजे समाजाला अनुकूल वागतो. पण एकट्याने समाजाला अनुकूल बनविण्याचे धाडस आपल्याला बऱ्याच वेळा होत नाही. त्यामुळे समाजाला अनुकूल बनविण्याचे काम एकेकट्याने करण्यापेक्षा गटाने करणे सोयीचे जाते….

पूर्ण लेख

६. समाजाशी एकरूप होऊया..

मागच्या लेखाच्या शेवटी दिलेले जे सामूहिक व व्यक्तिगत कृतिसंकल्प आहेत ते सगळे समाजाशी व देशाशी एकरूप होण्याचे म्हणजेच समाजात स्वतःला विरघळवून टाकण्याचे संकल्प आहेत. सामूहिक संकल्प केले ते बाकी कोणी पाळते आहे की नाही हे न पाहता स्वतः पाळायचा प्रयत्न…

पूर्ण लेख

७. हिंदू राष्ट्र आणि भारत राष्ट्र एकच

हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज म्हणजे आपले राष्ट्र असे शब्द पहिल्या प्रतिज्ञेत आहेत. या राष्ट्राची सेवा म्हणजे बहुतेकांना येथील समाजाची सेवा हेच प्रथम डोळ्यासमोर येते. तेथून सुरुवात करायची आहे. समाजाची सेवा करता करता त्या समाजाची संस्कृती आणि तिच्या…

पूर्ण लेख

८. राष्ट्रासाठी कृती

११वी-१२वीतील युवकांसाठी व युवतींसाठी वीरव्रत संस्काराची योजना करायचे ठरवले आहे. प्रबोधिनीत येणारे सर्वचजण ‘राष्ट्रार्थ भव्य कृती काही पराक्रमाची’ आपल्या हातून घडावी अशी इच्छा करत असतात. अगदी ‘राष्ट्रार्थ’ ही झाली पाहिजे व ‘पराक्रमाची’ ही झाली पाहिजे. वीरव्रत घेणे म्हणजे ‘पराक्रमाची कृती’…

पूर्ण लेख

९. प्रतिज्ञेचे स्वरूप

ज्ञान प्रबोधिनीमध्ये प्रतिज्ञा घेण्याची गरज का मांडली जाते? आपण कोणतेही काम नैसर्गिक प्रेरणेने किंवा काहीतरी मिळवण्याच्या / टाळण्याच्या इच्छेने किंवा ते आपले कर्तव्य वाटते म्हणून करतो. पहिल्या दोन प्रकाराने काम करताना ‘हे काम का करायचे?’ याचा विचार कमी होतो. कर्तव्य…

पूर्ण लेख

१०. केवळ सत्कार्य नव्हे सेवेला प्राधान्य

प्रबोधिनीची प्रथम प्रतिज्ञा केवळ सत्कार्याची किंवा नागरिक म्हणून कर्तव्ये पार पाडण्याची अशी न करता राष्ट्रसेवेचे व्रत घेण्याची का केली आहे ? आपण ज्या काळात, ज्या समाजात राहतो, त्याप्रमाणे आपले कर्तव्य निश्चित करावे लागते. कौटुंबिक, स्थानिक किंवा प्रांतिक विचार करून पुरत…

पूर्ण लेख

११. धर्म, संस्कृती आणि समाज

आपला धर्म, आपली संस्कृती आणि आपला समाज म्हणजेच आपले राष्ट्र असे राष्ट्राचे वर्णन प्रतिज्ञेत का केले आहे ? अनुभवाने, पाहून-ऐकून, कल्पनेने आणि विचार करून जे लोक आपले वाटतात त्या सर्वांचा मिळून समाज बनतो. त्या समाजाला इतिहास असतो, तो समाज आजही…

पूर्ण लेख

१२. केल्याने समाजदर्शन..

राष्ट्र म्हणजे फक्त काही लक्ष चौरस किलोमीटरची जमीन नाही. तिथे राहणारे लोक, त्यांची संस्कृती आणि त्यांचे आदर्श हे सगळे मिळून राष्ट्र बनते. हिमनगाचा थोडासा भाग समुद्राच्या वर असतो. त्यापेक्षा बराच मोठा भाग समुद्राच्या पृष्ठभागाखाली लपलेला असतो. तसे राष्ट्रातील लोक किंवा…

पूर्ण लेख

१३. सेवेतून नेतृत्वशक्तीचे संवर्धन

आधुनिक मानसशास्त्र किंवा व्यवस्थापनशास्त्र भारतात येण्यापूर्वी नेतृत्वशक्ती म्हणजे आत्मशक्ती असाच भारतामध्ये विचार व्हायचा. आत्मशक्ती ही सर्व मानवांविषयी प्रेम अशा रूपात प्रकट होते. व्यवस्थापनशास्त्रातील सर्वात आधुनिक विचारानुसार Servant leadership हीच खरी leadership असे समजले जाते. इतरांविषयी प्रेमापोटी जो त्यांची सेवा करतो,…

पूर्ण लेख

१४. सर्वसमावेशक स्वदेशी

प्रथम प्रतिज्ञेनंतरचे तुमचे मनोगत मिळाले. आजपर्यंत बहुतेक वेळा प्रतिज्ञा घेणाऱ्यांशी प्रतिज्ञाग्रहणापूर्वी काही ना काही चर्चा होत असे. प्रतिज्ञेसंबंधी जे सर्वसाधारण प्रश्न प्रतिज्ञा घेणाऱ्यांच्या मनात असतात, ते अनेकांशी बोलण्यातून लक्षात आलेले. त्याच्या आधारेच प्रतिज्ञेसंबंधी प्रश्नोत्तरे तयार केली होती. तुमच्या पत्रामध्ये तुम्ही…

पूर्ण लेख

१५. मातृभूमिपूजनास या..

दर वर्षी दिनांक १२ जानेवारी हा दिवस देशभर ‘युवक दिवस’ म्हणून साजरा होतो. त्या दिवशी विवेकानंद जयंती असते. विवेकानंदांनी युवकांना आवाहन केले म्हणून त्यांचा जन्मदिवस युवकदिन म्हणून गेली तीस वर्षे साजरा करण्यात येत आहे. विवेकानंदांनी केवळ युवकांनाच नाही तर देशातील…

पूर्ण लेख

१६. स्व-निश्चय आवश्यक..

प्रतिज्ञा घेतल्यानंतर त्याप्रमाणे वागणे जमले नाही तर काय होते ? आळस, कंटाळा, व्यावहारिक अडचणी, संशय, शंका अशा अनेक कारणांमुळे आपण हाती घेतलेले राष्ट्रसेवेचे काम थांबू शकते. प्रतिज्ञेची रोज आठवण ठेवली तर असे खंड पडण्याचे प्रमाण कमी होते. प्रतिज्ञा केली आहे…

पूर्ण लेख

१७. सश्रद्ध समर्पण

प्रतिज्ञा म्हणजे ध्येयमार्गाची प्रकट स्वीकृती आणि निश्चिती. मी अमुक एक काम करणार आहे किंवा करणार नाही, हे शपथेवर सांगणे म्हणजे प्रतिज्ञा होय. परमेश्वराचे स्मरण करून, देवदेवतांना आठवून, पूर्वजांचे नाव घेऊन, गीता, रामायण इत्यादी पवित्र ग्रंथ हातात धरून, सद्गुरुचे अथवा अन्य…

पूर्ण लेख

१८. विमल हेतू स्फुरो..

कै. आप्पांनी ‘माताजी-अरविंद काय म्हणाले?’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत गांधीजी – विनोबा ही हिंदुत्वाची एक परंपरा आणि सावरकर – हेडगेवारही हिंदुत्वाची दुसरी परंपरा असे म्हणले आहे. या दोन परंपरांमध्ये आज भासणारे मतभेद ५० वर्षांनी नाहीसे झालेले असतील असेही त्यांनी म्हणले आहे….

पूर्ण लेख

प्रथम प्रतिज्ञेसंबंधी कै. आप्पांची पहिली मांडणी 

(सिंहगडावर दि. ४/११/१९७४ रोजीच्या बोलण्याचे संक्षिप्त टिपण)        तपस्येमुळे जीवन पुनीत होते.        इंग्लंडने राष्ट्र म्हणून आपल्यावर राज्य केले. त्यासाठी लागणारे सैन्य भारतीय लोकांमधूनच उभे केले. स्वतः चाकरीमध्ये बुडून गेले आणि देशही बुडाला. असे लोक भारतात पुन्हा निर्माण व्हायचे नसतील…

पूर्ण लेख